जीवनाचा आध्यात्मिक पद्धतीने विचार आवश्यक
पुणे : मानवी जीवनाच्या कोड्याचे उत्तर केवळ विज्ञानाच्या बळावर मिळणार नाही. त्यासाठी जीवनाचा आध्यात्मिक पद्धतीने विचार करावा लागेल, असे उद्गार प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी काढले. पश्चिमेकडील लोकांनी शरीरविज्ञानाच्या अभ्यासात पूर्णता आणली. पण मनावर सत्ता कोणाची, याचे उत्तर विज्ञान देऊ शकलेले नाही. सुखाचे तीन प्रकार आहेत. पहिले म्हणजे इंद्रियाच्या साह्याने प्राप्त होणारे सुख. दुसरे चिंतनातून प्राप्त होणारे आणि तिसरे सुख म्हणजे चांगल्या ग्रंथांच्या वाचनाने होणारा उच्च दर्जाचा आनंद.
जीवनात समाधानासाठी तत्त्वज्ञान आवश्यक
पुणे- जीवनाला उपयोगी पडते ते समग्र विश्वाचे ज्ञान यालाच खरोखर तत्त्वज्ञान म्हणतात. मानवी जीवनात समाधान प्राप्त करावयाचे असेल तर विश्वाशी जुळवून घ्यावे लागते आणि त्यासाठी तत्त्वज्ञान आवश्यक आहे, अशा शब्दात प्रा. दे. द. वाडकर यांनी तत्त्वज्ञानाचे महत्त्व विशद केले.
यापुढे सहकारी क्षेत्रालाच उद्योगवाढीस परवानगी
मुंबई – यापुढे साखर उद्योगाच्या वाढीस फक्त सहकारी क्षेत्रालाच परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सांगितले.