भूमिहिनांना मिळालेल्या जमिनींची मोफत मशागत
यवतमाळ, दि. 15 – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आपल्या सर्व सहकारी मंत्र्यांना अशा सूचना दिल्या आहेत की, येत्या 15 दिवसांत त्यांनी आपापल्या जिल्ह्यात ज्या भूमिहिनांना जमिनी दिल्या असतील त्यांची मोफत मशागत करून द्यावी.
ब्रिटिश सरकारचा
“तसा’ विचार नाही
नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारावे अन्यथा त्यांनी हद्दपारीस तोंड द्यावे, अशी गोष्ट करण्याचा ब्रिटन सरकारचा उद्देश नाही.
भारतीय संगीताची बैठक बदलावयास हवी काय?
पुणे – भारतीय संगीतात गेल्या जवळजवळ शंभर वर्षांत बदल झालेला दिसून येत नाही. बदलत्या जीवनाचा परिणाम संगीतावर झालेला नाही. तसेच गेल्या तीस वर्षांत जे बदल झाले आहेत ते वरवरचे आहेत, असे विचार सुप्रसिद्ध सतारवादक आणि संगीत दिग्दर्शक भास्कर चंदावरकर यांनी मांडले. भारतीय संगीतात अंतर्गत आणि बहिर्गत असे दोन्हीही बदल घडून यायला हवे. संगीत हे सप्तक आणि नाद यांच्याशी जखडलेले आहे, ते मुक्त व्हायला हवे. सांगितीक भाषाही बदलणे आवश्यक आहे. बैठकीचा आविष्कार बदलायला हवा.