नवी दिल्ली – मोदी सरकारचा 10 वा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत आहेत तर सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. तत्पूर्वी अर्थमंत्र्यांनी अर्थ मंत्रालयात पोहोचल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या आशा आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेतील सूट वाढवणेही अपेक्षित आहे.
400 new generation Vande Bharat trains with better efficiency to be brought in during the next 3 years; 100 PM Gati Shakti Cargo terminals to be developed during next 3 years and implementation of innovative ways for building metro systems…: FM Nirmala Sitharaman
#Budget2022 pic.twitter.com/ANh5xJQFT1
— ANI (@ANI) February 1, 2022
अर्थमंत्री सीतारामन यांनी पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत रेल्वे तयार केल्या जाणार असल्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात रेल्वेला मोठी भेट देण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पुढील 3 वर्षांत 400 नवीन वंदे भारत गाड्या चांगल्या क्षमतेने चालवल्या जातील. पुढील 3 वर्षांमध्ये, 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील आणि मेट्रो प्रणाली तयार करण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब केला जाईल.