नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडत आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात येत आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी, भारतीय अर्थव्यवस्था ग्लोबल स्तरावर परेशानीचा सामना करत आहे मात्र या परिस्थितीत देखील भारतानं कोरोनो महामारीशी चांगला मुकाबला केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील 25 वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल. देशात आर्थिक रिकव्हरीला बळकट करण्यावर फोकस केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया मिळेल, असे अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय. आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असे त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असे त्यांनी म्हटले.
या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपये देणार आहोत, असे त्यांनी म्हटले.