औरंगाबाद – परभणी जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत 35 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. या निवासी आश्रम शाळेत एकूण 145 विद्यार्थी आहेत. त्यातील 35 जणांनी शाळेतील जेवण घेतल्यानंतर अचानक उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला.
गुरूवारी रात्री हा प्रकार घडला असे पोलिसांनी सांगितले. आजारी पडलेल्या काही विद्यार्थ्यांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून अशा गंभीर विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार नेमका कसा झाला याच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रम शाळेकडे धाव घेतली. त्यांनी आश्रम शाळेच्या व्यवस्थापनावर गलथानपणाचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.