लाहोर – पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतात विचित्र त्वचा रोगामुळे सुमारे 300 गायींचा मृत्यू झाला आहे. या गाययींच्या त्वचेला विषाणूजन्य संसर्ग झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या विषाणूचा संसर्ग अन्य लोकांनाही झाल्याचे आढळून आले आहे. हा रोग रक्तपिपासू किटकांपासून पसरला आहे.
काही विशिष्ट जातीच्या माशा, डास किंवा तत्सम किटकांमुळे हा संसर्ग होत असल्याचा अंदाज आहे. या संसर्गामुळे रक्तात गाठी येतात आणि ताप येतो. या तापाचे पर्यावसान मृत्यूनत होते. यापूर्वी अशाप्रकारे विषाणूचा जीवघेणा आजार पहायला मिळालेला नव्हता. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या जनावरांचे लसीकरण केले जाते आहे. तरध्धिक संसर्ग टाळण्यासाठी अशा जनावरांच्या कत्तलीचा पर्याय निवडला जातो आहे.
तीन आठवड्यांपूर्वीपासून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांमध्ये या संसर्गाची लक्षणे दिसायला लागली होती. या संदर्भात पशुवैद्यकीय विभागाने विशेष लक्ष दिले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हा विषाणूजन्य आजार अजूनही आटोक्यात आलेला नाही.