पंढरपूर – आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात, येणाऱ्या लाखो भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सुलभ दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीकडून विठ्ठलाचा पलंग काढून नित्योपचार बंद करून मंगळवार दि. 20 जूनपासून 24 तास दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यासोबत येणारे वारकरी, भाविक, विठ्ठल भक्त मंडळी तसेच आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरीत दाखल होणारे वारकरी, संत-महात्मे यांच्या पालख्या, विविध भागांतून येणाऱ्या दिंड्या, यांचे दर्शन विठ्ठलभक्तांना सुलभ व्हावे, म्हणून मंदिर समितीने 24 तास दर्शनाची सोय केली आहे. दरम्यान, यंदा आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात सुमोर पंधरा लाख भाविक दाखल होतील, असा प्राथमिक अंदाज आहे. येथे येणाऱ्या भाविकांमध्ये देश-विदेशासह राज्यभरातून येणाऱ्यांचा समावेश असतो.
दशमी, एकादशी, द्वादशी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे प्रशासनाकडून दर्शन रांगेतील भाविकांना चहा, पाणी, नाष्टा देण्यात येणार आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी उपाय योजना युद्धपातळीवर सुरू आहेत.