डॉ. पी. एन. कदम, M.B.B.S. M.Sc. (Psychotherapy)
-आजाराचे निदान होत नाही?
-निदान झाले आहे पण उपचारांबद्दल शंका आहे?
-कित्येक दिवस/महिने वर्ष उपचार सुरू आहेत पण प्रतिसाद अत्यल्प आहे किंवा नाहीच?
-अशावेळी परिपूर्ण उपचारासाठी “संकल्पपॅथी’
संपर्क : 8956222160 7330103010
www.sankalpacare.com
35 वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, येथून चइइड ची पदवी घेऊन चझडउ क्लीअर झाल्यानंतर काही काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले प्रसिद्ध वर्तनोपचारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पी. एन. कदम हे आज सर्वसामान्यांपासून ते असामान्यांचे तसेच अनेक सेलेब्रिटींचे पर्सनल डॉक्टर आहेत.
वर्ष 1991 आणि 1992 साठी राज्यपालांच्या हस्ते आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार प्राप्त. खपींशसीरींशव चशवळलरश्र चेवशश्र म्हणजेच एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचे पुरस्कर्ते, दीर्घ, सांसर्गिक, असांसर्गिक आजारांवर प्रदीर्घ संशोधन केले.
स्वास्थ्य किंवा आरोग्य हा विषय घेऊन भारतातील प्रत्येक राज्यात आणि परदेशात 1200 हून अधिक व्याख्याने आणि 350 हून जास्त कार्यशाळा, त्यांचे शासकीय, निमशासकीय आणि कॉर्पोरेट जगतासाठी अमूल्य योगदान आहे.
संकल्प’ या वैद्यकीय क्षेत्रातील अभिनव प्रयोगाबद्दल खूप चर्चा आहे. तर याची सुरुवात कशी झाली?
माझी नियमीत वैद्यकीय प्रॅक्टीस (गायनॅक, सर्जिकल, जनरल प्रॅक्टीस) करीत असताना, मला एक प्रश्न नेहमी पडायचा की, असे अनेक आजार आहेत, ज्यासाठी ऍलोपाथीच्या खूप काही मर्यादा आहेत. मॉडर्न मेडिसीन म्हणजे ऍलोपॅथीचे शिक्षण मी घेतले आहे. मात्र ऍलोपॅथीमधील लाक्षणिक उपचार आणि औषधांच्या भडिमारामुळे होणारे साईडइफेक्ट विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब, यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे होणारा किडनी, लिव्हर यावरील दुष्परिणाम हे पाहता मी आजारांच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला.
ऍलोपॅथी ही लाक्षणिक उपचारांवर प्रचंड प्रभावी आहे. तत्कालीक उपचार म्हणून ऍलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसीनकडे पाहता येईल. आजारांच्या मुळाशी जाऊन त्या लक्षणांवरती उपचार करून रुग्ण बरा कसा होईल यावर संशोधन सुरू केले. 1997 साली “संकल्प ट्रीटमेंट सेंटर फॉर बॉडी अँड माईंड’ याविषयावर “संकल्प’ची स्थापना झाली.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रत्यक्षात कार्यरत असलेले डॉक्टर्स/छोटे मोठे हॉस्पिटल्स यांचा कसा रिस्पॉन्स आहे?
ज्यावेळी हे कार्य सुरू झाले त्यावेळी प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखेच होते. 24 वर्षापूर्वी याला मान्यता मिळणे फारच दुर्लभ होते. मात्र आता सध्याची परिस्थिती अशी आहे की, अनेक प्रकारचे उपचार केल्यानंतर जेंव्हा रुग्णाला काहीच फरक पडत नाहीत, त्यावेळी अनेक डॉक्टर्स अशा रुग्णांसाठी “संकल्प’च्या उपचारपद्धतीचा आधार घेतात. “संकल्प’मध्ये केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून तपासण्यांवर अवलंबून न राहता, रुग्णाच्या आजाराच्या मुळांवर संशोधन केले जाते. त्याचबरोबर रुग्णाला बरे करण्यासाठी त्याच्या आहारामध्ये काय बदल केला पाहिजे, विहार म्हणजे, श्रम किती घेतो, विश्रांती किती घेतो, याचा समतोल साधला जातो. रुग्णांच्या भावभावनांचा विचार करून त्यांच्या वर्तणुकीवर काय बदल अपेक्षित आहे. यावर भर दिला जातो. तसेच त्याच्या विचारांमध्ये बदल काय अपेक्षित आहे, यावर विशेष भर दिला जातो. “संकल्प’ची ही उपचारपद्धती कोणतेही छोटे-मोठे क्लिनिक्स, हॉस्पिटल्स यासाठी पूरक उपचार पद्धती आहे; स्पर्धा नाही.
“एकात्मिक वैद्यकीय प्रणाली’ असा शब्द आपण वापरलात; पण मग या सगळ्या पॅथींना एकत्र करून एक नवीन पॅथी आपल्याला अपेक्षित आहे का?
संकल्पपॅथी म्हणजे इतर पॅथीसारखी केवळ औषध गोळ्या देणारी पॅथी नाही. तर ते एक वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तत्वज्ञान आहे. ऍलोपॅथीला विरोध न करता, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि सर्वात महत्त्वाचे मानसोपचार या सर्वांना एकत्र आणले तर एक अतिशय चांगलं मॉडेल उभे करून एक परिपूर्ण उपचारपद्धती अवलंबली जाऊ शकते.
कोणत्याही पॅथीला विरोध न करता प्रत्येक पॅथीची खास वैशिष्ट्ये तसेच त्याची मर्यादा लक्षात घेऊन “एकात्मिक वैद्यकीय प्रणाली’ वापरता येऊ शकते, याचे प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे “संकल्पपॅथी’. संकल्पपॅथी ही एक विचारप्रणाली आहे, जेथे प्रत्येक पॅथीने हातात हात देऊन, एकमेकांना समजून घेऊन, जर ती वापरण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक पॅथीतील कार्यकुशलतेचा फायदा रुग्णांना नक्कीच होऊ शकतो. ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार आणि मानवी मानसशास्त्र यांचे एकत्रिकरण करण्याचा हा आग्रही प्रयत्न असून, ही एकात्मिक वैद्यकीय प्रणाली आहे. वैद्यकीय क्षेत्राला आज “संकल्पपॅथी’ची गरज आहे.ल
संकल्पपॅथीची वैशिष्ट्ये काय आहेत?
जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला तुमचे मन आधी निरोगी ठेवता आले पाहिजे. अपघात किंवा तत्कालीक सांसर्गिक आजार वगळता बहुतांशी 65% ते 70% आजार हे आपल्या मनापासून तयार होतात. आपल्या सवयींमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे, विचार किंवा भावना व्यक्त करण्याच्या सवयींमुळे अथवा ताण-तणावांमुळे निर्माण होतात. “संकल्पपॅथी’ म्हणजे एकात्मिक वैद्यकीय प्रणालीमधील ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार आणि मानवी मानसशास्त्र हे सर्व जर एकत्र आले आणि रुग्णाच्या आजाराचे मूळ शोधून यावर त्या त्या विभागातील तज्ञांनी उपचार सुरु केले तर रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकेल.
यामध्ये काही आपात्कालीन अथवा अपघाती केसेस असतील त्यावेळी ऍलोपॅथी, मॉडर्न मेडीसीनचा वापर आवश्यकच आहे. पण या परिस्थितीतून तो रुग्ण बाहेर आल्यानंतर, जर त्याला पुढे कायमस्वरुपी काही गोळ्या औषधे घ्यायला लागत असतील, तर कुठेतरी चुकत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे आहार, विहार आणि विचार या त्रिसूत्रीवर आधारित एका नवीन उपचार पद्धतीद्वारे त्या त्या पॅथींचे उपचार घेऊन रुग्णाचे आजार मुळासकट बरे करणे हेच संकल्पपॅथीचे वैशिष्ट्य आहे.
खरंच हे प्रवाहाविरुद्ध पोहणे आहे. पण मग आज आपल्याला कितपत यश मिळाले आहे? भविष्यात याचा प्रसार करण्यासाठी नेमके काय नियोजन आहे?
भारतातल्या अनेक शहरांमध्ये याविषयीचे मार्गदर्शन करणारे अनेक व्याख्याने मी घेतली आहेत. जवजवळ 1200 हून अधिक व्याख्याने विविध राज्यांमध्ये घेतली आहेत. विशेषत: 30 ते 40 च्या गटाने डॉक्टरांना एकत्र करुन कार्यशाळा घेत आहोत. या प्रशिक्षणपर मार्गदर्शन कार्यशाळांना खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे. यामधील काही डॉक्टर्स “संकल्पपॅथी’ची अंमलबजावणी देखील करीत आहेत.
संकल्प’ चे नेमके कार्य कसे चालते?
“संकल्प’च्या कार्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आजारी पडण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून काय दक्षता घ्यावी हे मुख्य कार्य आहे. जरी आजारी पडलातच तर त्या आजाराच्या मुळाशी जाऊन जास्तीत जास्त अभ्यास करुन रुग्णाच्या आजाराच्या इतिहासावर लक्ष दिले जाते.
टीका म्हणून नव्हे, तर आज बऱ्याच डॉक्टर्सकडून रुग्णाच्या आजारी पडण्याच्या कारणांकडे लक्ष दिले जात नाही. मात्र “संकल्प’मध्ये एखादा रुग्ण आईच्या गर्भात असल्यापासूनची त्याची स्थिती, त्या मातेच्या त्यावेळी असलेल्या मानसिकतेचा आणि जन्मानंतर मुलाची वाढ होत असताना पालकांच्या स्वभावाचा त्याच्यावर होणारा परिणाम यावरही विचार केला जातो. ताण-तणाव, चिंता, भीती, नैराश्य यासारखे आजार निश्चितपणे आपल्या शरीरावर परिणाम करत असतात.
जे मनामध्ये घडते त्याचा शरीरावर परिणाम होतोच. तसेच शरीरातील वेदनेचा मनावर परिणाम होतो. या चक्रामध्ये आज भारतातीलच नव्हे तर जगामधील करोडो रुग्ण अडकलेले आहेत. त्यांना पुन्हा निरोगी व्हायचे असेल तर “संकल्पपॅथी’सारख्या “एकात्मिक प्रणाली’चा स्वीकार करावा लागेल.
प्रतिकार शक्तिबाबत आपण “इम्युनोथेरपी’ हा शब्द वापरलात याचा नेमका अर्थ काय? यावर काही संशोधन झाले आहे काय?
संकल्पचे कार्य सुरू झाले. त्यावेळी मनोशारिरीक आजारावर अभ्यास सुरू होता. गेली 12 वर्षे मी इम्युनोथेरपी किंवा प्रतिकारशक्तीचा अभ्यास करीत असताना माझ्या लक्षात आले की, शरीरातील बरं होणं ही प्रकिया “”आहार, विहार, विचारां’शी निगडीत आहे. शरीरातील पेशींची बळकटी आहाराशी निगडीत आहे.
मेडिटेशन, प्राणायाम, व्यायाम, सात्विक आहार, पुरेशी विश्रांती, सकारात्मक विचार असा हा “क्वांटम हिलिंग मॉडेल’ तयार केला गेला. सध्या हायब्रिड तंत्रज्ञानामुळे व खतांचा अतिरेकी वापर झाल्यामुळे आहारामधील अन्न धान्यातील तसेच पालेभाज्या किंवा फळभाज्यांमधील कस कमी झालेला आहे. आपल्या शरीराला लागणारा हरितद्रव्याचा (क्लोरोफिल) जो भाग आहे, त्यावर सर्व जीवसृष्टी मजबूत राहू शकते.
हे घटक जर शरीराला पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक किलो पालेभाज्या आणि फळभाज्या खाव्या लागतील. आज संकल्पने दररोज केवळ दहा मिली क्लोरोलाईफ आणि इतर मेडिकल न्युट्रिशनल थेरपीद्वारे कसा लाभ होतो यावर विशेष संशोधन केले आहे.
24 मे 2019 रोजी पुण्यातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात मी आय.टी.पी. या दुर्धर आजाराने गंभीर अवस्थेत होते. हिमोग्लोबिन 5 ग्रॅम तर प्लेटलेट काउंट 1000 होता. संकल्पची इम्युनो थेरपी डॉ. पी. एन. कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आणि अक्षरशः 72 तासांत चित्र बदलले. 11 महिन्यांच्या लहान मुलीला मी पाहू शकेल की नाही अशा अवस्थेतील मी आज नॉर्मल हिमोग्लोबिन आणि नॉर्मल प्लेटलेट काउंट यासह सुदृढ आयुष्य जगतेय. संकल्पची मेडिकल न्युट्रीशन थेरपी म्हणजे जीवनदायिनी आहे
सौ. माधुरी धुमाळ, गृहिणी, पुणे
12 डिसेंबर 2020 रोजी माझे कोविडचे निदान पॉझिटिव्ह आल्यावर आणि सीआरपी वाढलेला पाहून सर्वजण खूप काळजीत पडले. डॉक्टरांनी को-मॉर्बिडीटी असल्याने रिस्क नको म्हणून ऍडमीट होण्याचा सल्ला दिला कारण. परंतु “फिअर ऍण्ड स्केअर’ या भीतीच्या मॉडेलमधून बाहेर राहायचं, असा निश्चय करून संकल्पाच्या आरोग्य निर्भर 2.0 किट वर पूर्ण विश्वास ठेवला आणि मी घरीच हसत खेळत बरा झालो. दि. 25 डिसेंबर रोजी माझी अँटीबॉडी टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणजेच मी कोविडमुक्त झालो.
श्याम सोरटे, बी.टेक, एमबीए, उपाध्यक्ष इफ्टास, मुंबई