मुंबई – यंदाच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील 214 कैद्यांना सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त डीजी (तुरुंग) सुनील रामानंद यांनी दिली. यासाठी राज्यपालांची औपचारिक परवानगी घेतली जाणार आहे. सुनील रामानंद म्हणाले, आम्ही राज्यातील विविध तुरुंगातील 214 आरोपींना सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या आरोपींना तीन टप्प्यांत सोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 ऑगस्ट रोजी, दुसऱ्या टप्प्यात 26 जानेवारी 2023 आणि तिसऱ्या टप्प्यात 15 ऑगस्ट 2023 सोडण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात 43 हजार आरोपी विचाराधीन आहेत.