राहुरी, (प्रतिनिधी) – राहुरी तालुका व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये १८.७९ लाख निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिली. पतसंस्थेने सुरुवातीपासूनच सभासदांना 11 टक्के लाभांश दिला आहे.
काटेकोर कर्जवाटप, वसुलीचे कडक धोरण अवलंबून संस्थेच्या प्रगतीचा वाढता आलेख ठेवलेला आहे. संस्थेकडे आज अखेर 14.35 कोटी ठेवी असून कर्ज वितरण 12.27 कोटींचे करण्यात आलेले आहे. 5.17 कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे.सर्व निधीची ८८.५७ लाख रुपयाची स्वतंत्र गुंतवणूक केली आहे.संस्थेचे कर्ज वसुली उत्तम असून एनपीए फक्त 1.23% अल्पमात्र आहे. संस्थेला 23 -24 या आर्थिक वर्षात 79 लाख रुपये नफा झाल. सर्व तरतुदी करून ताळेबंदास 18.79 लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे.
संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून संस्थेच्या ग्रामीण भागात नवीन शाखा सुरू करून लहान, मध्यम व्यावसायिकांना सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे उपाध्यक्ष प्रल्हाददास राठी यांनी सांगितले. त्यादृष्टीने संस्थेने कार्यवाही चालू केली आहे. तालुक्यातील व्यापारी तत्त्वावर चालू झालेली लहानशी संस्था सभासद व सर्व हितचिंतक व्यापारी यांच्या सहकार्याने भरभराटीस आलेली आहे.
संस्थेला शुभारंभापासूनच लेखापरीक्षण वर्ग अ मिळालेला आहे. संस्थेने दरवर्षी सभासदांना 11 टक्के लाभांश दिला आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात 25 कोटी ठेवींचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी व लहान मोठे व्यापारी यांच्या सहकार्याने ते साध्य होईल, असा विश्वास चेअरमन प्रकाश पारख व उपाध्यक्ष प्रल्हाददास राठी यांनी व्यक्त केला.
तसेच गावागावांतून दैनिक बचत ठेव प्रतिनिधींची नेमणूक करून सुशिक्षित तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. संस्थेचे संचालक पारसमल राका,आनंद पारख, रमण वाघ , विजय आळपे, विक्रम चव्हाण, नसीरभाई शेख, नवनाथ शेंडे, छाया दुग्गड,रजनी शेजुळ,प्रभारी मुख्य कार्याधिकारी तात्यासाहेब गायकवाड, व्यवस्थापक मिलिंद सातभाई , हबीब सय्यद ,सविता करपे आदी यावेळी हजर होते.