राहुरी, (प्रतिनिधी)- देवळाली प्रवरा येथील सर्वधमियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्राेत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या “नाद करा आमचा कुठं’ या लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमाने यात्रा उत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमाचा शहरवासियांनी मनमुराद आनंद लुटला.
समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवानिमित्त कीर्तन, कुस्त्यांचा हंगामा, फटाक्यांची आतिषबाजी, पालखी मिरवणूक निमित्त महाराष्ट्रातील नामांकित ब्राॅस बँडची जुगलबंदी रंगली. दिल्ली व अजमेर येथील रहाट पाळण्याचा शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.
खेळणी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली. सोमवारी रात्री शशिकांत कोठावदे निर्मित नाद करा पण आमचा कुठं या कार्यक्रमाने यात्रा उत्सवाची सांगता झाली.
माया कुटेगावकर, संगीता लाखे, अर्चना जावळेकर, नमिता पाटील, प्राची मुंबईकर, किरण पुणेकर आदिंसह अनेक नृत्यागणांनी लावणी, आयटम सॉंग आदी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रसिद्ध गायक स्वप्नील गायकवाड व निवेदक सोमनाथ फड यांच्या कलाविष्काराने कार्यक्रमास रंगत आणली.
यात्रा यशस्वीतेसाठी कमिटी अध्यक्ष डॉ.विश्वास पाटील, मेजर राजेंद्र कडू, तुळशीराम कडू, शुभम पाटील, संजय पाटील, नारायण कडू, गणेश भांड, सतीश वाळुंज, भारत शेटे, सुखदेव होले, दीपक पठारे, अनिल ढुस, शिवराम कडू, बापू कडू, संदीप पाटील, राजेंद्र पोकळे, धनंजय शिंदे, मुस्ताक शेख, शिवप्रसाद मुसमाडे, सचिन सरोदे आदींसह यात्रा कमिटी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.