ठाणे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिकांवर अंमलबजावणी संचनालयाने टाच आणली. या सदनिका सील केल्या असूनही त्याचे बाजारभावाने मुल्य सहा कोटी 45 लाख रुपये आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनलाय. आपण जी आकडेवारी दिली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छपणे सांगते की राजकीय किंवा अन्य हेतुने कुणालातरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पाच सहा वर्षापुर्वी ही ईडी नावाची संस्था येथे बसलेल्या कुणालाही माहिती नव्हती. मात्र आता ही ईडी गावागावात पोहोचली. या सगळ्या गोष्टीचा गैरवापर दुर्दैवाने सुरु आहे. बघू आता त्याला काही पर्याय निघतो का?
दरम्यान, महाराष्ट्रात अंमलबजावणी संचनालयाची कारवाइर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. ईडीने यापुर्वी मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे.
संचालनालयाने सहा मार्च 2017 रोजी पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांविरुद्ध मनी लॉंड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती आणि आधीच पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. 21.46 कोटी किंमतीच्या महेश पटेल, चंद्रकांत पटेल, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित कंपन्या आहेत. त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने पुष्पक ग्रुपच्या मेसर्स पुष्पक रियल्टीचा निधी वापरला होता.
मेसर्स पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली 20 कोटी रपिये नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना विविध जोडलेल्या संस्थांद्वारे वापरल्याचे अंमलबजावणी संचनालयाचे म्हणणे आहे. अनेक शेल कंपन्या चालवणारे नंदकिशोर चतुर्वेदी यांनी त्यांच्या शेल कंपनी मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत जास्त असुरक्षित कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे हस्तांतरित केले. मेसर्स श्री साईबाबा गृहनिर्मिरी प्रा.ला 30 कोटी महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने काढून घेतलेले, असेही ईडीकडून सांगण्यात आलं आहे.
भाजप महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप
राज्यात ईडी सुडाने कारवाई करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून सतत महाविकास आघाडीकडून करण्यात यतोय. तर या कारवाईत केंद्रचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या राडारावर आहेत. त्यामुळे या कारवाईने हा संघर्ष आणखी वाढणार हे स्पष्ट झालं आहे.
श्रीधर पाटणकर कोण?
श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्या पत्नी रश्मी यांचे बंधू आहेत. ते डोंबिवलीत राहतात. ते उद्योजक असून त्यांचे वडील माधव पाटणकरही उद्योजक होते. यांच्या पुष्पक ग्रुप कंपनीची निलांबरी प्रकल्पातील या 11 निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे फ्लॅट्स आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत.