नवी दिल्ली : पाच वर्षाखालील दर तीन मुलांपैकी एक मूल कुपोषित आणि योग्य वाढ झालेले नसते, अशी धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्रे बालनिधीच्या (युनिसेफ) अहवालात देण्यात आली आहे.
हीन दर्जाच्या अन्नामुळे मोठ्यासंख्येने बालके या लक्षणांना बळी पडत आहेत., असेही बालक, अन्न आणि आहार या विषयावरील अहवालात नमूद केले आहे.
सुमारे 20 कोटी बालके कुपोषित अथवा लठ्ठपणाच्या समस्यांनी बाधीत आहे. वाढीच्या महत्वाच्या टप्प्यातील म्हणजे सहा महिने ते दोन वर्षाच्या वयोगटातील दोन तृतियांश मुलांना योग्य पोषण मुल्ये असणारा आहार मिळत नाही. मेंदूचा योग्य विकास न होणे, शिकण्यातील मंदत्व, साथीच्या बाधेची शक्यता, लहानपणीच मृत्यू अशा समस्यांना त्यामुळे सामोरे जावे लागते.
आहार आणि आरोग्य यांची माहिती देणारे तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले. मात्र त्यावेळी जगाला मूळ वाईट खाईल तर ते वाईट आयुष्य जगेल, या वास्तवाचा विसर पडला, असे सांगून युनिसेफचे कार्यकारी संचालक हेन्रिएट्टा फोर म्हणाल्या, लक्षावधी मुले केवळ पर्याय नाही म्हणून आरोग्यपूर्ण आहार घेत नाहीत.
कुपोषणावर तीहेरी भार पडत आहे. तो म्हणजे, कमी पोषक आहार, लठ्ठपणा आणि आवश्यक अहारातील कमतरता. पाच वर्षाखालील 14.9 कोटी मुलांची पुरेशी वाढ झाली नाही किंवा त्याच्या वयाच्या मानाने फार अपुरी वाढ झाली आहे. 5 कोटी मुले ही त्यांच्या उंचीच्या माने फारच हडकुळे आहेत, ही कुपोषणाची सामान्य लक्षण आहेत. त्याचवेळी चार कोटी मुले लठ्ठपणाने त्रस्त आहेत. त्यातील निम्म्या मुलांना पुरेशी व्हिटॅमिन आणि पोषण मुल्ये मिळत नाहीत असे या अहवालात म्हटले आहे. तर केवळ 42 टक्के मुलांना सहा महिन्यापर्यंत पुरेसे स्तनपान मिळते.