सोरतापवाडी – नायगाव येथील 5 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सोरतापवाडी येथील 3 जणांना करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मेहबूब लुकडे यांनी दिली. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांची अहोरात्र सेवा करत आहेत. नागरीकांनी घाबरून न जाता स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहन नायगावच्या उपसरपंच कल्पना चौधरी यांनी केले आहे. ऊरुळी कांचन येथील करोनाचा आकडा वाढतच चालला आहे. करोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी कसल्याची प्रकारची सोय नाही. स्वॅब देऊन आले की अहवाल येण्याच्या आधी संपर्कातील व्यक्ती गावात फिरताना दिसत आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्ण दवाखान्यात दाखल होण्यास टाळाटाळ करीत आहेत. संपर्कातील व्यक्तींमुळे उरुळी कांचनची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
बाधितांच्या संपर्कामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. सगळीकडे सोशल डिस्टन्स पाळले पाहिजे. बाहेर जाताना मास्कचा वापर केला पाहिजे, तरच आपण करोनाला हरवू शकतो.
-सागर कांचन, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस