पुणे : देशामध्ये म्हाळुंगे बालेवाडी क्रीडानगरीचे अतिशय आदराने नाव घेतले जाते. विशेष म्हणजे देशातले व राज्यातले अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्य करण्यास येत आहेत. एवढं सगळं असूनही म्हाळुंगे गावाला आज पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सतावत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गावातील पाण्याची समस्या सोडवायची असेल तर पायाभूत सुविधांची गरज आहे. या सुविधा निर्माण होई पर्यंत या गावांसाठी दररोज 20 पाण्याचे टॅंकर देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याच्या भावना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून पुणे मनपा मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे या दोन गावांसाठी रोज 2 लक्ष लिटर म्हणजेच रोज 20 टॅंकर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा संकल्प बालवडकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या निमित्ताने आज सकाळी म्हाळुंगे गावात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी, या दोन्ही गावांसह, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांमध्ये समान पाणी योजना राबविण्यात यावी त्यासाठी, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी, म्हाळुंगे गावचे सरपंच मयूर भांडे, उपसरपंच बेबीताई पाडाळे, काळूरामजी गायकवाड, गिताताई गुजर, विवेक खैरे, पांडुरंग पाडाळे, श्री. अजिंक्य निकाळजे, स्मिता पाडाळे, युवराज कोळेकर, उज्ज्वल पाडाळे, ग्रामपंचायत सदस्या बेबीताई खैरे राजेंद्र पाडाळे , सुनिल पाडाळे ,लक्ष्मण पाडाळे युवा नेते, राहुल कोकाटे, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगीळ,अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद व मित्रमंडळ यांच्यासह ग्रामस्थ तसेच प्रभाग 9 चे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.