भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यावर आज पावसाने पाणी फेरले असून आता हा सामना आज दुपारी 3 वाजल्यापासून आहे त्या स्थितीपासून पुढे खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये न्यूझीनलंडने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंड संघाची चांगलीच वाताहत झाली होती. पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी न्यूझीलंड संघाने ४६.१ षटकांमध्ये ५ गड्यांच्या मोबदल्यात २११ एवढी किरकोळ धावसंख्या उभारली होती.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढील न्यूझीलंडची किरकोळ धावसंख्या व भारतीय फलंदाजांची स्पर्धेतील आतापर्यंतची जबरदस्त कामगिरी यांमुळे भारतीय संघ या सामन्यामध्ये सहज बाजी मारेल असा विश्वास भारतीय प्रेक्षक व्यक्त करत होते मात्र आता सामन्यामध्ये पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना आज आहे त्या स्थितीमध्ये सुरु होणार आहे.