अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर याने सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीबाबत केलेल्या एका ट्वीटमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. फरहान याने आज, रविवारी सकाळी एक ट्वीट करत भोपाळच्या मतदारांना आज म्हणजे 19 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. फरहान याने केलेल्या ट्वीटमध्ये काहीही चुकीचे नव्हते. पण हे ट्वीट करण्यास त्याला एक आठवडा उशिर झाला.
भोपाळमध्ये दि. 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. परंतु फरहानने आता लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. फरहानने ट्वीटमध्ये लिहिले की, प्रिय भोपाळच्या मतदारांनो, हीच ती वेळ आहे, जी की आपले शहर पुन्हा येणा-या संकटापासून वाचवू शकता. #SayNoToPragya #SayNoToGodse #RememberTheMahatma #ChooseLoveNotHate
सोशल मीडियावर फरहानने केलेल्य या ट्वीटमुळे लोकांना संताप व्यक्त करत त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. अनेकांनी तीव्र शब्दांत कॉमेंट करत त्याच्यावर टीका केली. त्यामुळे तो थोडा अडचणीत आला आहे. आता तो ही चुक कशी सुधारत ट्रोलिंग करणा-यांना उत्तर देतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.