भूटानचे पंतप्रधान डॉ. लोटे त्शेरिंग यांनी दिली प्रतिक्रीया
थिंफू (भूतान) – डोकलामबाबत चीनने “जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी, असे आवाहन भूटानचे पंतप्रधान डॉ. लोटे त्शेरिंग यांनी केले आहे. भारत, चीन आणि भूटान यांच्यातील त्रिज्या पॉईंटजवळ कुणीही एकतर्फी कारवाई करू नये, असेही ते म्हणाले.
2017 मध्ये डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. जोपर्यंत सध्याची “जैसे थे’ स्थिती कायम राहील तोपर्यंत या क्षेत्रात शांतता राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. भूटान आणि चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर डोकलामच्या चीनकडील बाजूस लष्करासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते.
दरम्यान, दक्षिण आशियाच्या विकासासाठी भारत आणि पाकिस्तानने एकत्र काम केले पाहिजे. तसेच “सार्क’चा लाभ झालेला नाही, असे म्हणणे खूप घाईचे होईल, असेही ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानातील तणावामुळे 2014 नंतर “सार्क’ची बैठक न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.