बढत्याही रद्द; कंपनी विकण्याच्या कामाला वेग
नवी दिल्ली – 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या एअर इंडियातील भरती व बढत्या बंद करण्यात आल्या आहेत. कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट मर्यादित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. या वर्षात ही कंपनी विकण्याचा संकल्प सरकारने जाहीर केला आहे. त्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली चार कॅबिनेट मंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या कंपनीत 10 हजार कर्मचारी काम करतात. मात्र, वृत्तसंस्थेने एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक विभागाशी संपर्क साधला असता यावर प्रतिक्रिया मिळाली नाही.
कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाने सर्व विभागप्रमुखांना भरती आणि भढत्या बंद ठेवण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी 75 टक्के भागभांडवल विकण्याचा सरकारने प्रयत्न केला होता. मात्र, त्याला यश मिळाले नव्हते. आता पुढील चार ते पाच महिन्यांत भागभांडवल विकण्यासाठी निर्णायक पावले उचलली जातील. नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग यांनी ही कंपनी नफ्यात आणून नंतर विकू असे सांगितले होते.