पिंपरी – अपघातानंतर आलेल्या अपंगत्वाला कटाळून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 25) पहाटे उघडकीस आली. खंडू दयानंद मुळे (वय 22, रा. जाधववाडी, चिखली. मूळगाव लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडू हा आपल्या भावासोबत राहत होता.
त्यास एक वर्षापूर्वी अपघात झाला होता. त्यामध्ये त्याच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने अपंगत्व आले होते. या पायाचा त्रास त्यास वारंवार होत होता. या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरात पहाटे पाच वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.