मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1094 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1976 रुग्ण करोनामुक्त
झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 हजार 932 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरू असून 1,29,714 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 870 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
गेल्या 24 तासांत मुंबईत 347 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत 363 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत सध्या 3326 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2761 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील करोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.