रायपुर: छत्तीसगडच्या रायपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे उद्घाटन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले. यावेळी लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “सर्व धर्म, जाती, आदिवासी, दलित आणि मागास यांना सोबत न घेता भारताची अर्थव्यवस्था चालवता येत नाही.”
केंद्र सरकारवर हल्ला चढवत गांधी म्हणाले, “तुम्हाला जे करायचे आहे ते करा.” परंतु जोपर्यंत आपण या देशाला जोडणार नाही. तोपर्यंत या देशातील जनतेचा आवाज विधानसभा, व लोकसभेत ऐकायला मिळेल. कारण शेतकरी, मजूर, गरीब, आदिवासी देशाची अर्थव्यवस्था चालवतात.
राहुल गांधी म्हणाले, जर फक्त 10-15 लोकांना संपूर्ण पैसे देणार, नोटाबंदी कराल, चुकीचा जीएसटी लागू कराल तर भारतात रोजगार मिळणार नाही आणि देशाची अर्थव्यवस्था देखील चालणार नाही. छत्तीसगडमधील हिंसाचार पूर्वीच्या तुलनेत खाली आला आहे कारण विद्यमान सरकार लोकांचा आवाज ऐकत आहे. विधानसभेत प्रत्येकाचा आवाज ऐकू येतो. आपल्याला देशातील परिस्थितीची जाणीव आहे. आपल्याला इतर राज्यांत जे चालले आहे ते सर्व माहित आहे. आपल्याला शेतकर्यांची समस्या, आत्महत्या, अर्थव्यवस्थेची स्थिती, बेरोजगारी माहित आहे, याची पुनरावृत्ती करण्याची गरज नसल्याचे गांधी म्हणाले.