ओतूर – ओतूर (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या राजीनाम्यासाठी पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्ते यांच्यात पूर्वी काही अलिखित ठराव झाले होते; मात्र सत्ता कोणाला नकोय? सुरुवातीला सकारात्मक असणाऱ्या सरपंच यांनी एक वर्षे कार्यकाळ पूर्ण करून झाल्यावर
राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दर्शविला तसेच सरपंच ओतूर यांच्या एककल्ली कारभाराविषयी साशंकता निर्माण झाल्याने राष्ट्रवादीच्याच इतर 13 सदस्यांनी सरपंचावर अविश्वास ठराव आणला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागली आहे.
ओतूर चे सरपंच यांचे विरुद्ध अविश्वास ठराव संमत करण्यासाठी 13 सदस्यांनी सरपंच हे सदस्यांना विचारात न घेता मनमानीपणे कामकाज करीत असल्याचे कारण देऊन जुन्नरचे तहसीलदारांकडे अर्ज केला असता गुरुवारी (दि. 10) दुपारी 3 वाजता विशेष सभेचे
आयोजन केले असल्याची बाब पुढे आली आहे. या सभेचे कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 35 नुसार चालणार असून सर्व सदस्यांना सभेला हजर रहाण्याविषयी लेखी स्वरूपात सूचित करण्यात आले आहे.
ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीत 17 पैकी 14 सदस्य निवडून आल्याने एक हाती सत्ता स्थापन करण्यात यश आले असताना गोठात झालेली चर्चा आता समोर येत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी उपसरपंच राजीनामा आणि निवड नाट्य सामान्य जनतेत चर्चेला असताना सरपंच अविश्वास ठराव,
आणि त्यावर राजकीय समीकरणे कशी आणि कधी बदलणार या विषयावर आता ओतूरसह संपूर्ण तालुका भर समीकरणे बदलली जाणार असल्याबाबत सामन्यात या विषयी उलट सुलट चर्चा आहेत. याबाबत ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब र्वीघरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन संपर्काच्या बाहेर होता.
विरोधकांना आयतेच कोलीत
सरपंच कारभाराने कंटाळून अखेर इतर स्वकीय सदस्यांनीच अविश्वास ठराव आणण्याचा घाट घातला असल्याने आता विरोधी पक्षाला देखील आयते कोलीत मिळाले आहे.