मुंबई – राज्यात करोनाची तिसरी लाट आता ओसरू लागलेली आहे. तसेच करोनाबाधितांच्या संख्याही सातत्याने घट होता आहे. यापुढे जाऊन जर पूर्ण क्षमतेने अथवा 50 टक्क्यांहून अधिक क्षमतेने वर्ग सुरू करायचे असतील तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांनी तशी सविस्तर चर्चा करायला हवी, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे महाविद्यालये पूर्ण क्षमतेने खुली करण्याबाबत सामंतांनी संकेत दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक व संबंधित उपस्थित होते.
यानंतर सामंत म्हणाले, ज्या ठिकाणी करोना आटोक्यात आला आहे. तिथून तसा प्रस्ताव कुलगुरूंनी जिल्हाधिकार्ऱ्यांमार्फत आमच्याकडे पाठवावा. त्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग नेमलेल्या तज्ञांशी चर्चा करेल आणि प्रस्ताव आलेल्या भागातील परिस्थिती अनुकूल आहे, असे निदर्शनास आल्यास त्या महाविद्यालयांना तशी मान्यता दिली जाईल, असे सामंत यावेळी म्हणाले.