नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी शुक्रवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष संघटना आणि कार्यकर्ते (AAP) हीच आपल्या पक्षाची सगळ्यांत मोठी ताकद आहे असे यावेळी नमूद करतानाच त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची (Modi Sarkar) मला तुरूंगात पाठवण्याची योजना असल्याचा आरोप करत सरकारवर निशाणा साधला.
केजरीवाल म्हणाले की आम्ही तुरूंगात जायला घाबरत नाही. मी एकदा 15 दिवस तुरूंगात राहुन आलो आहे. आतमध्ये बऱ्यापैकी व्यवस्था असते. त्यामुळे तुम्ही तुरूंगात जाण्यास घाबरू नका. जर भगतसिंग तुरूंगात राहु शकतात, मनिष सिसोदिया 9 महिन्यांपासून तुरूंगात राहत आहेत, सत्येंद्र जैन वर्षभरापासून तुरूंगात आहेत तर आम्हालाही तुरूंगात जाण्याची भिती वाटत नाही. (Kejariwal In Jail)
आम्हाला सत्तेचा लोभ नाही. 49 दिवसांनी मी राजीनामा दिला होता. कोणी आपल्या चौकीदाराच्या नौकरीचा राजीनामा देत नाही. मात्र जगातील मी एकमेव मुख्यमंत्री असेल की ज्याने 49 दिवसांनंतर आपल्या मर्जीने पदाचा राजीनामा दिला होता. मला मुख्यमंत्रिपदाची लालसा नाही. मी राजीनामा द्यावा की तुरूंगातून आपले सरकार चालवावे याबाबत विविध जणांशी सल्लामसलत सुरू आहे. सर्व आमदार आणि नगरसेवकांशीही मी चर्चा केली आहे आणि आता कार्यकर्त्यांची मते जाणून घेतो आहे. (Kejariwal On Nrendra Modi)
केजरीवाल म्हणाले की दिल्लीतील जनतेने आपल्याला भरपूर प्रेम दिले. त्यांची इच्छा नसेल तर आपण काहीच नाही. तुम्हाला आता घरोघरी जावे लागेल आणि दिल्लीतील लोकांना विचारावे लागेल की आम्ही आता काय करायला हवे? येत्या दहा- पंधरा दिवसांत आपल्याला संपूर्ण दिल्ली पिंजून काढायची आहे. मी राजीनामा द्यायचा की सरकार चालवायचे हे त्यांना विचारा. जनता जो निर्णय देईल तेच मी करेल. (AAP Vs Bjp)
कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही आता हे गृहीत धरा की लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज सुरू झाला आहे. प्रचार सुरू झाला आहे आणि प्रत्येक घरात जाऊन नरेंद्र मोदी यांचे पितळ उघडे करायचे आहे. मी तुरूंगात असो वा बाहेर यावेळी दिल्लीतील लोकसभेची एकही जागा भारतीय जनता पार्टीला जाता कामा नये.