आळंदीत शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय वारकरी परिषदेला टोला
आळंदी- विठ्ठलाच्या, माउलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनाला जायचे असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितले की, तुम्हाला परवानगी नाही. तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही. त्यामुळे मी फारसे लक्ष देत नाही असा खोचक टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला आहे.
स्वानंद सुखनिवासी सदगुरू विष्णुबुवा जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि. 8) आयोजित कार्यक्रमात भाविकांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. दरम्यान, वारकरी परिषदेचे वक्ते, महाराज यांनी जारी केलेल्या पत्रकात्र नमूद केले आहे की, शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला. “पवार हे हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात.
पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये; अशा आशयाचे पत्रक महाराजांनी जारी केले होते, यावर शरद पवार यांनी भाष्य करीत अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय वारकरी परिषदेला टोला लागावला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने विश्वस्तांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
- लहान सहान गोष्टी होतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असते. आपणाला जो रस्ता पसंत आहे त्या रस्त्यावर प्रामाणिकपणाने जायचे असत. तिथे बांधिलकी ठेवायची असते. त्यांच्यामध्ये तडजोड करायची नसते. आज मी आळंदीमध्ये आलो आहे, मनामध्ये कुठला हेतू ठेवून आलो नाही. पंढरपूर, देहू, आळंदीला, तुळजापूर आणि शेगावला जात असतो. माझा या सर्व ठिकाणी जाण्याचा हेतू त्याच प्रदर्शन करण्याचा नसतो.
-शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री