कबीर बोबडे
नगर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसमध्ये आता प्रथमोपचार पेट्या दिसेनाश्या झाल्या आहेत. जनसामान्यांसाठी गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे बस याप्रमाणे परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास अविरत सुरू आहे लालपरी ही सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन आहे. त्यामुळेच लालपरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे. मात्र महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या अनेक बसमधील प्रथमोपचार पेट्याच गायब झाल्या आहेत.
त्यामुळे उपचाराची गरज भासल्यास प्रवासी व कर्मचाऱ्यांवर प्रथमोपचार करणे अशक्य झाले आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, ह्या पेट्या वाहकाकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण एखादा अपघात झाल्यानंतर वाहकाकडे असलेल्या प्रथमोपचार पेट्यांचा वापर झाला की नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
कि, ह्या पेट्य केवळ औपचारिकता म्हणून वाहकाकडे सुपूर्द केल्या आहेत. यामुळेच महामंडळाच्या गलथान कारभारावर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. तरीही प्रवाशांना विविध सोई-सुविधा दिल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला जातो. मात्र आता बसगाड्यांतील प्रथमोपचार पेट्या दिसेनाशा झाल्या आहेत. चालक, वाहक व प्रवाशांसाठी बसगाड्यांत बसवलेल्या प्रथमोपचार पेट्यांत बॅण्डेज, मलम, आयोडिन, चिकटपट्ट्या, औषधी गोळ्या, कात्री आदी साहित्य ठेवले जात होते.
प्रथमोपचार पेटीची जबाबदारी वाहकाकडे देण्यात आली होती. परंतु त्यातील साहित्य गायब व्हायचे, त्यामुळे त्या पेट्या काढून टाकून त्या वाहकाकडे सोपविण्यात आल्या. प्रथमोपचार पेट्यांबाबतच्या समस्येकडे एसटीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. परंतु सामान्य प्रवाशांची दखल घेतली जात नाही, असा आरोप होत आहे.
एस.टी. बसला जर अपघात झाला तर अपघाताच्या वेळी तातडीने प्रथमोपचार करता यावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली आहे अपघात ठिकाणापासून दवाखाना दूर असला तरी तिथेच प्रथमोपचार केल्यावर प्रवाशाचा जीव वाचू शकतो मात्र एस.टी.मधील चालक, वाहक किंवा आगारातील कर्मचारी कुणीही लक्ष देत नसल्याचे प्रथमोपचार पेटीलाच प्राथमिक उपचाराची गरज आहे याशिवाय एसटीमध्ये मोठा गाजावाजा करुन बसवलेले वायफाय तर केवळ नावापुरतेच उरले आहेत.
एसटीमध्ये प्रथमोपचार पेट्या नसल्यामुळे सदैव प्रवाशांच्या सेवेत असणाऱ्या एसटीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एस.टी महामंडळातील अधिकाऱ्यांचा हा हलगर्जीपणा अनेकदा प्रवाशांच्या जिवावर बेतू शकतो, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या. त्यामुळे वाहकाकडे प्रथमोपचार पेटी असेल तर ह्या पेटीचा तातडीच्या वेळी प्रवाशांना उपयोग दिल्या जातो का, कि, टाळाटाळ केल्या जाते, याकडे महामंडळ प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रत्येक बसमध्ये अग्नीशमन यंत्रना बसवलेली आहे. शिवाय प्रथमोपचार पेट्या देखिल बसवलेल्या होत्या. मात्र, नंतर त्या पेट्या काढून टाकण्यात आल्या. आता त्या प्रथमोपचार पेट्या वाहकाकडे सुपूर्द केल्या आहेत. प्रथमोपचार पेटीची जबाबदारी वाहकाकडे दिली आहे. तातडीच्या वेळी प्रवाशांना प्रथमोपचार दिल्या जातो.
विजय गिते, विभागीय नियंत्रक, प्रादेशिक परिवहन महामंडळ