मणिपूर – येथे गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे आणि दिवसेंदिवस तेथील परिस्थिती चिघळत चालली आहे. अशात महिलांवर अत्याचार करून नग्न धिंड काढणाऱ्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी देशभरात खळबळ माजली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आली आहे.
दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीच्या नावावर रक्तपात सुरू आहे. येथे 120 हून अधिक लोक मारले गेले आहेत, हजारो लोक बेघर झाली आहेत आणि अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. काहींनी पती गमावला तर काहींचा मुलगा परतला नाही. घरे उध्वस्त झाली आहेत. दरम्यान, मणिपूर येथील हिंसाचार कधी थांबणार असा प्रश्न सध्या सर्वांसमोरच उपस्थित होत आहे. तेथील समस्येवर तोडगा काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित कशी केली जाईल हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार का होतोय ?
– मणिपूरमधील मेईतेई, नागा आणि कुकी हे तीन प्रमुख समुदाय आहेत.
– मेईतेई बहुतेक हिंदू आहेत आणि ते ओबीसी वर्गात येतात. मेईतेई लोकांची लोकसंख्याही राज्यात जास्त आहे. राज्यातील नागा आणि कुकी हे बहुसंख्य ख्रिश्चन आहेत आणि ते दोघेही अनुसूचित जमातीत येतात.
-राज्यातील मेईतेईची लोकसंख्या सुमारे ६०% आहे आणि हा समुदाय इंफाळ खोऱ्यात राहतो.
-राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% भागात मेईतेई समुदाय राहतो आणि उर्वरित 90% डोंगराळ आहे. कुकी आणि नागा समुदायांसह राज्यातील सुमारे 40% लोकसंख्या येथे स्थायिक आहे.
-डोंगरावर नागा आणि कुकीसह 30 हून अधिक लहान-मोठ्या जमाती आहेत. हा समाज अनुसूचित जमातीत येतो. त्यांच्याकडे अनेक सुविधा आहेत आणि ते फक्त डोंगराळ भागात राहू शकतात.
-मेईतेई समाजाचा त्याला विरोध आहे. राहण्यासाठी जमीन कमी असल्याने आम्हालाही एसटीचा दर्जा मिळावा, असे त्यांचे म्हणणे आहे. एसटीचा दर्जा मिळाला तर. त्यामुळे ते डोंगरावर स्थलांतरित होऊ शकतील.
कुकी समाजाला डोंगरावर मेईतेईचा हस्तक्षेप नको आहे
हा वादाचा मुद्दा आहे, कारण डोंगराळ भागात राहणार्या जनतेला वाटतं की मेईतेईना एसटीचा दर्जा मिळाला तर ते वरच्या भागात येऊन हक्क मिळवतील. यापूर्वीही वाद झाला होता. मात्र यावेळी मणिपूर उच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात मेईतेई समाजाला शेड्यूल ट्राइब वाला स्टेटस दिला जावा असा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्यात हिंसाचार सुरूच आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत काय केले?
घरामध्ये (राज्यात) दोन भावांमध्ये (मेतेई-कुकी) भांडण झाले तर ते कुटुंबातील सदस्यांनीच सोडवले पाहिजे. घर मणिपूर आहे आणि इथे केंद्र सरकार पालकाच्या भूमिकेत आहे.
सरकारने आतापर्यंत काय केले?
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने लष्कर आणि आसाम रायफल्स तैनात केले. 40 IPS अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली 20 वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत आणि भारतीय हवाई दलालाही सेवेत सामावून घेण्यात आले आहे. जिथे हिंसाचार झाला तिथे कर्फ्यू लावण्यात आला. खोटी आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर टाकू नये. हिंसा भडकू नये. त्यामुळे इंटरनेटवर बंदी आहे. जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचारात सहभागी असलेल्यांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः मणिपूरला भेट दिली. तसेच हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांना शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन केले.