दिवे (पुणे) – स्थानिक गट-तट तसेच परंपरागत वर्चस्वाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार चालवला जातो. सत्ताधाऱ्यांसमोर सत्ता टिकवण्याचे तर इतरांना सत्ता हस्तगत करण्यासाठीचा कस ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून लागतो. पुरंदर तालुक्यातील 66 ग्रामपंचायत निवडणुकींचे वॉर्ड रचना व आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण सध्या तापायला सुरूवात झाली आहे. निवडणुका अद्याप जाहीर होतील याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. ज्या दिवशी तारीख जाहीर होतील तसा हा जोर आणखी वाढणार हे निश्चित.
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचातींच्या वॉर्ड रचनेचे काम पूर्ण झाले असून तालुक्यातील 66 ग्रामपंचायती पैकी 18 गावांतून एकूण 26 हरकती आल्या होत्या, त्यापैकी नऊ हरकती स्वीकारल्या असून बाकी इतर सर्व हरकती फेटाळण्यात आल्या. तालुक्यातील जवळ जवळ सर्वच गावात करोनाचे संकट असले तरी सध्या ते आटोक्यात आले तरी पण ते कथी उसळी मारेल हे सांगता येणार नसल्याने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार असले तरी गावातील अति उत्साही नेते मंडळी मात्र जोरादार कामाला लागले आहेत.
पुरंदरमधील बऱ्यात गावात राजकीय वातावरण ढवळून लागले असून नेते मंडळी ही गावभेटी घेऊन कार्यकर्ते जमा करण्यास सुरूवात केली आहे; परंतु करोना, निसर्ग अतिपाऊस यामुळे शेतकऱ्यांसह सामन्य नागरिक अडचणीत असून दिवाळी सुरू झाली असली तरी अनेकांच्या घरात अद्याप दिवा लागलेला नाही. त्यांना दोनवेळच्या भाकरीची अद्यापही भ्रांतही आहे. त्यामुळे तो या ग्रापंचायतीच्या निवडणुकीकडे न बघता आपले व कुटुंबाचे पोट कसे भरेल अन् दोन पैसे कसे बाजुला पडतील यावर लक्ष केंद्रीत केले आहे. तर इच्छुकांचे गरजवंतांकडे लक्ष न जाता ज्याच्याकडे अधिक आहे त्यावरच व घर की भाकीच्या राजकारातच लक्ष ठेवून आहेत. निवडणूक जाहीर होताच सदस्यपदावर आपली वर्णी लागावी यासाठी पॅनल प्रमुख किंवा राजकीय पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे फेऱ्या वाढल्या आहेत. तर आपण सदस्य किंवा सरपंचपदासाठी कसे लायक आहोत यासाठी सोशल मीडियावर छुपा पण जोरदार प्रचार सुरू आहे. तर दिवाळीचे औचित्य साधून दिवाळी शुभेच्छा व भेटी देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या अघोषित रणधुमाळी सुरू झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
- केवळ वर्चस्व दाखवण्यसाठीच?
बदलत्या वातावरणात ग्रामीण भागत स्वयंपूर्ण व्हावा, मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींचा आरखडा ठरवला जातो. त्यामाध्यमातून निधी मिळत असतो. मात्र, आपल्याकडे अजुनही परंपरागत राजकारण गटा-तटांतील वाद यामुळे विकासात्मक राजकारणाला पाहिजे त्या प्राधान्य क्रमाने पाहिले जात नाही, त्यामुळे ग्रामपंचायत सारखी महत्त्वाची यंत्रणा केवळ वर्चस्व दाखवायसाठी आणि गावातील फुटकळ राजकारण करण्यासाठी वापरली जाते, हे मात्र निश्चित!