मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करून नव्या चेहऱ्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे.
आरोग्यमंत्री डॉ. हर्श वर्धन यांच्यासह बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी या नेत्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आलं आहे. तर यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
मंत्रिमंडळ बदलून काय होणार??
सरकारच बदला…
देश वाचेल..!!— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) July 7, 2021
मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर आता काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. “मंत्रिमंडळ बदलून काय होणार ? सरकारच बदला, देश वाचेल..!!”, अस ट्विट भाई जगताप यांनी केलं आहे.