अकोला – आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे. (Obc sabha in Jalana)
शुक्रवारी अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने ओबीसी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबेडकरांनी भुजबळांवर हल्लाबोल केला.
आंबेडकर पुढे म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊ.आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचे आहे.
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. जरांगेंचा बोलविता धनी कोण विचारणाऱ्या राज ठाकरेंचा बोलविता धनी कोण? असा प्रश्नही यावेळी आंबेडकरांनी विचारला आहे.