मुंबई – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना माध्यमांकडून कंगनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी एका कसलेल्या राजकारणी नेत्यासारखे त्यांनी हा विषय सहज हाताळला आणि कंगणाचे नाव न घेता महाराष्ट्र सरकार योग्य असल्याचे म्हटले.
उर्मिला म्हणाल्या की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षांत सरकारने कुणालाही त्रास दिला नाही. तसेच यापुढेही देणार नसल्याचे मला खात्री आहे.
दरम्यान, कंकणाने महाराष्ट्र सरकारवर मध्यंतरी तोफ डागली होती. मुंबईला ‘पाक’ असेही संबोधले होते. त्यावेळी कंगणावर संमिश्र प्रतिक्रिया उमटली होती. यावेळी उर्मिला यांनी कंकणावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. कंकणाची चूक दाखवून उर्मिलाने महाराष्ट्र सरकारची बाजू घेतली होती.
कंगणाविषयी बोलण्याऐवजी उर्मिला यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी चांगले बालून माध्यमांचा मूळ प्रश्न बाजूला ठेवला.