कोइम्बतूर – यशस्वी जयस्वालची अफलातून खेळी व शम्स मुलाणीसह अन्य गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा तब्बल 294 धावांनी पराभव करत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या सामन्यात खरेतर पहिल्या डावात दक्षिण विभागाने आघाडी घेत वर्चस्व राखले होते, मात्र पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात पाचशेपेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला व नंतर मुलाणीसह अन्य गोलंदाजांनी दक्षिण विभागाच्या फलंदाजीची वाताहत करत पश्चिमेचा मोठा विजय व विजेतेपद साकार केले.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🏆
Congratulations to West Zone on winning the Duleep Trophy 👏 👏 #DuleepTrophy | #Final | #WZvSZ | @mastercardindia
Scorecard ▶️ https://t.co/NAjd4WfQDJ pic.twitter.com/AquEv8ngXM
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 25, 2022
या सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा केल्या. त्याला उत्तर देताना दक्षिण विभागाने आपल्या पहिल्या डावात 327 धावा करत महत्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर यशस्वी जयस्वालच्या 265 धावांची अभूतपूर्व खेळीच्या जोरावर पश्चिम विभागाने आपला दुसरा डाव 4 बाद 585 धावांवर घोषित केला व दक्षिण विभागासमोर विजयासाठी पाचशेपेक्षा जास्त धावांचे लक्ष्य ठेवले.
त्याचा पाठलाहग करताना शनिवारी दक्षिण विभागाचा दुसरा डाव 6 बाद 154 असा घसरला होता व ते 375 धावांनी पिछाडीवर होते. रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी खेळ सुरु झाल्यावर त्याचा दुसरा डाव 234 धावांवर संपला व पश्चिम विभागाने 294 धावांनी दणदणीत विजय मिळवला व दुलीप करंडकावर नाव कोरले.