Wedding Season In India | देशभरातील व्यापारी समूह 15 जानेवारी ते 15 जुलै या कालावधीत लग्नाच्या हंगामासाठी जोरदार तयारी करत आहेत. व्यापारी समुदायाच्या अंदाजानुसार या सहा महिन्यांत देशात सुमारे 42 लाख विवाह होतील. लग्नाशी संबंधित खरेदी आणि सेवांच्या माध्यमातून सुमारे 5.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असा व्यापारी संघटनेचा अंदाज आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ची संशोधन शाखा कॅट रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने हा अंदाज वर्तवला आहे. देशातील सर्व राज्यांतील व्यापारी वर्गाशी झालेल्या चर्चेच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
42 लाख विवाह होतील (Wedding Season In India) –
कॅटचे अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, एकट्या दिल्लीत या लग्नाच्या हंगामात 4 लाखांहून अधिक विवाह होण्याची शक्यता आहे. त्यातून सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. देशभरात गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी संपलेल्या लग्नाच्या मोसमात सुमारे 35 लाख विवाह झाले होते. त्यावर सुमारे 4.25 लाख कोटी रुपये खर्च झाले.
यंदाच्या लग्नाच्या हंगामात, अंदाजे 5 लाख विवाहांसाठी, एका लग्नासाठी 3 लाख रुपये खर्च येईल, तर अंदाजे 10 लाख विवाहांसाठी, एका लग्नासाठी अंदाजे 6 लाख रुपये खर्च येईल. याशिवाय 10 लाख विवाहांसाठी प्रत्येक लग्नासाठी 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर 10 लाख लग्नासाठी प्रत्येक लग्नासाठी 15 लाख रुपये खर्च येणार आहे. तर 6 लाख विवाहांसाठी 25 लाख रुपये खर्च येईल.
60 हजार विवाह ज्यांचा प्रति लग्न खर्च 50 लाख रुपये असेल. 40 हजार विवाह असतील ज्यांचा खर्च 1 कोटींपेक्षा जास्त असेल. एकूण अंदाजे आकडेवारी पाहिल्यास, सहा महिन्यांत लग्नाशी संबंधित खरेदी आणि सेवांचा व्यवसाय अंदाज 5.5 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज आहे. प्रत्येक लग्नासाठी कमी अधिक प्रमाणात खर्च येतो. त्यानुसार ही अंदाजे आकडेवारी काढण्यात आली आहे.
लग्नसमारंभात जास्त मागणी कशाला असते (Wedding Season In India) ?
विवाहसोहळ्यांची मागणी लक्षात घेऊन ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि मागण्या पूर्ण करता येतात. ते म्हणाले की, प्रत्येक लग्नासाठी सुमारे 20 टक्के खर्च वधू-वरांवर जातो. तर 80 टक्के खर्च इतर लग्नसमारंभांवर होतो.
लग्नाच्या हंगामापूर्वी घराचे नूतनीकरण आणि रंगकाम हा मोठा व्यवसाय आहे. याशिवाय दागिने, साड्या, लेहेंगा-चुनरी, फर्निचर, तयार कपडे, शूज, लग्नपत्रिका, सुका मेवा, मिठाई, फळे, पुजेचे कपडे, किराणा, धान्य, सजावटीचे कापड, गृहसजावट, विद्युत उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भेटवस्तूंची मागणी जास्त असते. हे सर्व व्यवसाय लग्नाच्या दिवसांमध्ये तेजीत राहतील.
या व्यवसायांना होईल फायदा (Wedding Season In India) –
बँक्वेट हॉल, हॉटेल्स, ओपन लॉन, कम्युनिटी सेंटर्स, सार्वजनिक उद्याने, फार्महाऊस यांचे लग्नासाठी आगाऊ बुक केले जातात. याशिवाय मंडप सजावट, लग्नस्थळाची सजावट, फुलांची व्यवस्था, क्रॉकरी, खानपान सेवा, प्रवासी कॅब सेवा, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, बँड, संगीत कलाकार, डीजे सेवा, लग्नाच्या मिरवणुकीत घोडे, गाड्या, दिवे, ढोल, यांसारख्या अनेक सेवा यांना मोठा व्यवसाय मिळतो.