यवत, (वार्ताहर)- तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत असताना कुसेगावला पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कसलेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने गाव प्रशासन पाण्याबाबत निष्काळजी दिसत असल्याचे महिला वर्गाकडून बोलले जात आहे. वरवंडचा तलाव आटल्याने कुसेगावचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.
कुसेगावला पुणे जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय पेयजल योजनेतून २०१७-१८ रोजी काम झाले होते. मात्र, ही नळ पाणीपुरवठा सुविधा योग्य रीतीने सुरू असून ती उपलब्ध आहे. मात्र, वरवंड येथील तलाव आटला की योजनेचा पाणीपुरवठा बंद होत असल्याने पाण्यासाठी नागरिक व महिलांना भटकंती करावी लागत आहे. तरी करोडो रुपये खर्च करून जलजीवनचे काम सुरू होते. मात्र, ते सध्या अपूर्ण आहे. काम पूर्ण झाले तरी तलाव आटला की कुसेगावला पाणीटंचाई होणारच हे निश्चित आहे.
मात्र, दलित वस्तीसाठी एक विहीर असताना त्याचे पाणी कधीच संपुष्टात येत नाही, हे जेष्ठ व्यक्तीकडून बोलले जात आहे. मात्र, या विहिरीचे पाणी ग्रामपंचायत प्रशासनाने गावाला उपलब्ध करून दलित वस्तीला आणि गावलाही उन्हाळ्यात होणारी पाण्याची अडचण निर्माण होणार नाही. मात्र दलित वस्तीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत निष्काळजी धोरण राबवत आहे का, हे कोडे काही नागरिकांना उमगेनासे झाले आहे.
नवनिर्वाचित सरपंच यांच्या माध्यमातून शासकीय विहिरीतील पाणी गावाला उपलब्ध करून दिले आहे. ते पाणी कमी पडत असल्याने नागरिकांच्या वाट्याला येत नसल्याने सर्वात जास्त तोटा दलित वस्तीचा होत असल्याने पंचायत समिती नळ पाणी पुरवठा विभागाने दलित वस्तीला मोटर पंप पाइपलाइन टाकून व्यवस्थित नव्याने नळ पाणी योजना सुरू करून द्यावी, अशी मागणी दलित वस्तीतील महिला वर्गानी केली आहे..