नवी दिल्ली : कोणत्याही निवडणुकीच्या वेळी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवार अनेक प्रकारचे आमिष देत असतात. असेच आमिष आंध्रप्रदेशमधील मतदारांना देण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सध्या त्यांनी दिलेल्या एका आश्वासनामुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी “भाजपाला मत दिल्यास तुम्हाला २०० रुपयांची दारूची बाटली ७० रुपयाला देऊ,” असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी दिले आहे.
आंध्र प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यास ५० रुपये प्रति क्वार्टर बाटली दराने दर्जेदार दारू पुरवठा करण्याचे आश्वासन सोमू वीरराजू यांनी दिले. सध्या दर्जेदार दारूची एक बाटली २०० रुपयांच्या वर विकली जाते. सोमू वीरराजू यांनी पक्षाच्या जाहीर सभेत बोलताना वीरराजू यांनी निकृष्ट दर्जाची दारू चढ्या भावाने विकल्याबद्दल राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात सर्वच बनावट ब्रँड जास्त किमतीत दारु विकतात, तर चांगले आणि लोकप्रिय ब्रँड्स राज्यात उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला.
Cast one crore votes to Bharatiya Janata Party…we will provide liquor for just Rs 70. If we have more revenue left, then, will provide liquor for just Rs 50: Andhra Pradesh BJP president Somu Veerraju in Vijayawada yesterday pic.twitter.com/U9F1V8vly7
— ANI (@ANI) December 29, 2021
भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर महिन्याला १२ हजार रुपये खर्च करत होती. ती रक्कम त्यांना एका योजनेच्या नावाखाली सरकारकडून दिली जाते. राज्यातील एक कोटी लोक दारूचे सेवन करत आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत या एक कोटी लोकांनी भाजपाला मतदान करावे, अशी त्यांची इच्छा आहे.
जर, भाजपाला एक कोटी मत मिळाली तर राज्यात ७५ रुपये प्रति बाटली या दराने चांगली दर्जेदार दारू मिळेल आणि महसूल उरला तर ती ७५ ऐवजी ५० रुपये प्रति बाटलीने विकली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारूचे कारखाने असून ते सरकारला स्वस्तात दारू पुरवतात, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्षांनी यावेळी केला.