आसाम – आसाममधील ऑल इंडिया यूनाटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे आमदार अमीनूल इस्लाम यांनी मोगल बादशहा औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरांना दान केले होते असा दावा केला आहे. भारतातील मंदिरांना दान केलेल्या मंदिरामध्ये त्यानी सूप्रसिद्ध कामाख्या मंदिराचाही समावेश असल्याचे सांगितले आहे.
ते पुढे बोलतांना म्हणाले ,’औरंगजेबाने ४०० हिंदू मंदिराना जमीनी दान केल्या होत्या. गुवाहाटीत असलेले सूप्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरारालाही जमीन दान केल्याचे इस्लाम यांनी म्हटले आहे. त्यांनी स्थानिक पत्रकारांना या दाव्याबाबत पवित्र आसाम या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. मोगल काळात जे झाले तेच आपण सांगत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महेश्वर नीओग यांनी हे पुस्तक लिहिले.’
दरम्यान,आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी भारत १९४७ साली सेक्यूलर झाल्याचे म्हटले होते. परंतू भारत अनेक वर्षांपासून धर्मनिरपेक्ष असल्याचे अमीनूल इस्लाम यांनी म्हटले आहे.