मुंबई – महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूर येथे झालेल्या सभांनंतर ही तिसरी वज्रमूठ सभा असणार आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या सभेकडे लक्ष लागले आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
वज्रमूठ सभेच्या भाषणातील मुद्दे –
– मला मिंदेंना सांगायचं आहे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. सर्व जाती धर्माची लोकं माझ्यासमोर बसले आहेत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा सर्वसामान्यांनी दिला होता. मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षक सत्तेत बसला होता. मुंबई, गुजरातमध्ये गोळीबार केला होता. अनेक जणांचा मृत्यू झाला होता. – उद्धव ठाकरे
– आपलं सरकार गेल्यानंतर या खोके सरकारने सोन्याची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली – उद्धव ठाकरे
– उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात;मी येत्या 6 तारखेला बारसूत जाऊन बोलणार आहे. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी बारसूला जाणार. 6 तारखेला बारसूला जाणार मग महाडच्या सभेला जाणार.
– हे सरकार दगाफटका करून सत्तेवर आलेले सरकार- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा हल्लाबोल
– 31 हजार कोटींची बिल सरकारं थांबवली, करोना काळात आघाडी सरकारचं काम चांगलं होत – अजित पवार
– ही तिसरी वज्रमूठ सभा आपण घेतो. जेव्हा वज्रमूठ सभा जवळ येते तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होते. आपण सत्तेच्या बाहेर जाऊ, लोकं आपल्याला विरोध करतील, अशी भीती सत्तेची मलई खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांना वाटते – नाना पटोले
– एक नेता 9 वर्षापासून मन की बात सुरू आहे… काम की बात नाही करत…मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, त्यातून शिवसेनेवर आघात; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
– उद्धव ठाकरे बीकेसी मैदानातील सभास्थळी दाखल
– इथल्या कष्टकरी मराठी माणसाने मुंबईची शोभा वाढवली. मागील 10 वर्षात मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर राग असलेली लोक दिल्लीत बसली आहेत. -जितेंद्र आव्हाड
– बारसूमधील लोकांशी चर्चा अद्यापही नाही. नाटे गावातून मच्छिमारातून 30 हजार लोकांना रोजगार मिळत आहे, चांगल्या सुविधा दिल्यास एक लाखांना रोजगार मिळेल; जितेंद्र आव्हाड यांचा दावा
– सध्या राज्यात असलेलं सरकार हे घटनाबाह्य असून ते कोसळणार असल्याचं विधान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून केलंय.
– ना मुंबईचा आवाज, ना मंत्रिमंडळात एकही महिला असं हे गद्दार सरकार आहे. हे सरकार कंत्राटदार आणि बिल्डरांचं सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
– ‘तुम्ही म्हणालात कधी कधी 50 टक्के काम होतात, कधी कामं होत नाहीत. पण आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामं पूर्ण होतील,” असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं आहे.