सोलापूर – राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असताना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, बार्शी आणि मंगळवेढा या परिसरात रविवारी सायंकाळनंतर आणि रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे.
या पावसामुळे उन्हाळ्यात काही काळ का होईना थंडावा निर्माण झाला. मात्र द्राक्ष आणि गहू अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्षांवर परिणाम झाला नसला तरी वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी द्राक्षे पडली आहेत. आज पहाटेच्या पावसाने द्राक्षांच्या दरात किलोमागे 8 ते 10 रुपयांची घसरण झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.