Uma Bharti In Ayodhya । उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर आता काशी आणि मथुरामधेही मंदिरे बांधण्याची मागणी जोर धरू लागलीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी महत्तवपूर्ण विधान केलंय. “राम मंदिरासाठी जसे आंदोलन झाले तसे कोणतेही आंदोलन आता यापुढे होणार नाही कारण मथुरा आणि काशीच्या निर्माणासाठी सर्व पुरावे उपलब्ध आहेत.” असे त्यांनी म्हटलं.
पण मंदिर तिथेच बांधले पाहिजे Uma Bharti In Ayodhya ।
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात दर्शनासाठी उमा भरती आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे महत्वाचे वक्तव्य केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, उमा भारतींनी” “जसे अयोध्येत घडले, तसेच काशी आणि मथुरेचेही तसेच होईल म्हणजेच याठिकणी आंदोलनाशिवाय मंदिर उभारणी होणार आहे. तसेच राम मंदिरासाठी उत्खनन करून पुरावे मिळाले पण मुथरा आणि काशी येथे उत्खननाशिवाय पुरावे उपलब्ध आहेत.” असे म्हटले.
त्यासोबतच “या पुराव्यांच्या आधारे न्यायालय जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, पण मंदिर तिथेच बांधले पाहिजे, असा माझा विश्वास आहे. या देशातील मुस्लिमांना कायद्याने हिंदूंप्रमाणे समान अधिकार आहेत. कोर्ट जो काही निर्णय देईल, तो मान्य करेल.”असेही त्यांनी यावेळी म्हटलं.
‘लोकसभा निवडणुकीत विरोधकांना धूळ चारणार Uma Bharti In Ayodhya ।
त्या पुढे म्हणाल्या,”अयोध्येतील मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर मला हनुमानगढीला जाता आले नाही, म्हणून मी याठिकाणी आले.” लोकसभा निवडणूक 2024 वर भाष्य करताना,, “यावेळी सर्वांचा सफाया होईल. मोदीजी म्हणतात की एनडीए 400 पार करेल, पण मी म्हणते भाजप एकटा 400 पार करेल. काँग्रेस फक्त 15 ते 20 जागांपर्यंत मर्यादेत राहील” असा दावा यावेळी भारती यांनी केला.