मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील रक्त फोटोची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. नीती आयोगाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदेनी दिल्लीत हजेरी लावली होती यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्व मान्यवरांसह बैठकीनंतर फोटो काढला. या फोटोमध्ये मुख्यमंत्री शिंदे मागच्या रांगेत उभे असल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले होते त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.
या सर्व प्रकरणाबाबत उदय सामंत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, “फोटो बघितल्यावर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे केवळ फोटोसाठी तिथे उभे होते,” तसेच राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्या दिवशी एकनाथ शिंदे हे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला होते. ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव आहे,” असं देखील उदय सामंत यावेळी म्हणाले.
“महाराष्ट्राचा मान-सन्मान दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने नक्की वाढलेला आहे. त्याची प्रचिती ओबीसी आरक्षणापासून अनेक गोष्टींमधून आलीय. शिंदेंचा कोणता अपमान केलाय असं मला तरी वाटत नाही,” असं स्पष्ट मत सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
रोहित पवारांनी केलं होत ट्विट
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात ! अशा आशयाचे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात या फोटोबाबत चर्चा सुरु झाली होती.