श्रीनगर – काश्मिरातील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या जिल्ह्यातील हरदमंद गुरी भागात काही अतिरेकी लपले असल्याची माहिती सुरक्षा जवानांना त्यांच्या गुप्तचरांकडून मिळाली. त्यामुळे त्या गावाला सुरक्षा दलांनी वेढा दिला. त्यावेळी जवानांवर गोळीबार करून या दहशतवाद्यांनी तेथून पळ काढण्याच्या प्रयत्न केला, त्यावेळी झालेल्या चकमकीत हे दोन दहशतवादी ठार झाले.
अजूनही त्या परिसरात काही दहशतवादी लपले असून त्यांच्याशी जवानांची चकमक सुरूच असल्याचे सायंकाळपर्यंतचे वृत्त होते. या सुरक्षा वेढ्यात तीन दहशतवादी सापडले आहेत, असे पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर नमूद केले होते, पण या एका दहशतवाद्याच्या शोधासाठी जवानांना बरेच प्रयत्न करावे लागले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत तो जवानांच्या हाती आला नव्हता.