अणे-नगर – कल्याण महामार्गावर पेमदरा येथील भीषण अपघातामध्ये कर्जुले हर्याचे दोघांचा जागीच मृयतू झाला. शुभांगी आशिष आंधळे (वय 30) व यश सचिन आंधळे (वय 11) असे मृत्यू झालेल्यांच्या नावे आहेत तर आशिष आंधळे (वय 35), सचिन आंधळे (वय 36 वर्ष), प्राची आंधळे (वय 11, सर्व रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) हे जखमी झाले आहेत.
रविवार (दि. 1) पहाटे पाचच्या सुमारास हे सर्वजण आपल्या ताब्यातील स्विफ्ट कारने (एमएच 16 बीसी 1399) मुंबईवरून कर्जुले हर्या गावाकडे जात होते. दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याचे कडेच्या इलेक्ट्रिक पोलला आदळली व भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर, तिघे जखमी झाले. जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डवले करीत आहेत, अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार पंडित फड यांनी दिली.