गडचिरोली- गडचिरोलीतील मोसम गावात झालेल्या वाघीण शिकार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. वाघिणीच्या शिकाराची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासांत दोन आरोपींना गजाआड केले आहे. तर इतर एका आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींनी वाघिणीची शिकार करुन गावालगतच पुरले होते, अशी माहिती मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मोसम गावात झालेल्या वाघीण शिकार प्रकरणी दोन आरोपी अटकेत तर एक फरार आहे. आलापल्ली वनक्षेत्रातील मोसम गावालगत वाघिणीची शिकार करून शव जमिनीत पुरण्यात आले. वाघिणीच्या मृतदेहाचे अवयव देखील बेपत्ता आहेत. वनविभागाने 24 तासांत आरोपींचा माग काढत 3 पैकी 2 आरोपींना अटक केली आहे.
राकेश नावाचा एक आरोपी वनविभागाच्या तावडीतून फरार झाला आहे. आरोपींकडून काही नखे, मिशा व अन्य अवयव जप्त करण्यात आले आहे. मुख्य आरोपी राकेश तेलंगणात फरार झाल्याचा संशय आहे. मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये यांनी दौरा करत धक्कादायक घटनेचा आढावा घेतला होता. आरोपीच्या शोधासाठी वनविभागाने तीन स्वतंत्र पथके गठीत केली आहेत.