मुंबई – बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. वयाच्या 60 व्या वर्षात त्यांनी लग्न केल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. मात्र यावर त्यांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही दिले होते. मात्र करिअरच्या सुरुवातीच्या काळात आशीष यांना त्यांच्या सावळ्या रंगावरून सुनावले जात असे. याबाबत त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
सुरुवातीच्या काळात लोक आशिष यांना कालू म्हणून लोक चिडवत असे, एका मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितले आहे. ते म्हणाले की, “मी दिल्ली शहरात लहानाचा मोठा झालो. तेव्हा लोक माझ्या रंगावरून माझी खिल्ली उडवायचे आणि आजही उडवतात. मला एक गोष्ट माहिती आहे की मी सगळ्यांची तोंड बंद करू शकत नाही. दिल्लीमध्ये तेव्हा लोक मला रंगावरून हाक मारायचे. आजकाल याला चुकीचं मानलं जातं पण तेव्हा मला रंगावरून हाक मारायचे”.
पुढे ते म्हणाले, “मला असं वाटतं की लोक तो शब्द मला शिवी म्हणून वापरत होते. पण मी आहे काळा आहे. तुम्ही माझा रंग मला शिवी म्हणून वापरत आहात. पण मला यात कोणतीही शिवी वाटत नाही. मला स्वत:ला हे समजावं लागलं. मला वाईट वाटलं. लोक मला चांगल्या नावाने हाक मारतील याची मी वाट पाहायचो. मला काही लोकांनी कालू म्हणत फार वाईट रित्या चिडवलं होतं आणि ते लोक माझेच मित्र होते. मला वाटतं की लोकांना काय बोलायचं आहे ते बोलू देत ते त्यांच्यावर झालेले ते संस्कार आहेत”.
दरम्यान, आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले. कोलकात्याच्या एका क्लबमध्ये त्यांनी आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्न केले. रुपाली बरुआ ह्या फॅशन उद्योजक आहेत. यापूर्वी आशिष विद्यार्थी यांचा विवाह अभिनेता शकुंतला बरुआची मुलगी राजोशी बरुआ यांच्याशी झाला होता.