टिकमगड (मप्र) – मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यात शुक्रवारी एका जोडप्याने आणि त्यांच्या किशोरवयीन मुलीने धावत्या रेल्वेगाडी पुढे उडी मारून आत्महत्या केली. आर्थिक तंगीमुळे त्यांनी हे कृत्य केले असे सांगण्यात येत आहे.
ही घटना आज सकाळी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या खरगापूर रेल्वे स्थानकाजवळ घडली असून आर्थिक अडचण हेच त्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण होते असे प्राथमिक तपासातून दिसून आले आहे.
लक्ष्मण (35), रजनी (32) आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या संबंधीत पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “कुटुंबाची एक छोटीशी शेतजमीन होती, जी त्यांच्यासाठी उदरनिर्वाहासाठी पुरेशी नव्हती. या कुटुंबाला पुरेसे उत्पन्नही मिळत नव्हते. त्यामुळे हे कुटुंब हैराण होते. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.