माजी उपमुख्यमंत्री पवार यांचा विश्वास
सासवड- पुरंदर-हवेलीचा विकास करण्याची धमक फक्त संजय जगताप यांच्यात आहे. यासाठी जगताप यांच्या रुपाने खणखणीत नाणे दिले आहे. जगताप यांना पुरंदर-हवेलीच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सासवड येथील पालखी तळावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ सांगता सभा झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले की, विजय शिवतारे यांना निवडणूक आल्यावरच गुंजवणीचे पाणी आठवते. मात्र, हे पाणी आणण्याची त्यांच्यात धमक नाही.
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, हरीश सणस, विजय कोलते, सुदाम इंगळे, संभाजी झेंडे, दिलीप बारभाई, डॉ. दिगंबर दुर्गाडे, बबूसाहेब माहूरकर, माणिक झेंडे पाटील, प्रदीप पोमण, दत्ता झुरंगे, आनंदीकाकी जगताप, मार्तंड भोंडे, गणेश ढोरे, वीणा सोनवणे, प्रदीप लांडगे, संजय ग. जगताप, राजेश चव्हाण, शिवाजी पोमण, बापू भोर, बबन टकले, राजेश काकडे, नंदकुमार जगताप, बाळासाहेब कामथे, अरुण जगताप, नारायण निगडे, भैय्या खैरे, जयदीप बारभाई, उमेश जगताप, सुनीता कोलते उपस्थित होते.
- भ्रमणध्वनीद्वारे पवारांचा संदेश…
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना आम्ही सर्वांनी एक विचाराने उमेदवारी दिलेली आहे. प्रचारासाठी येण्याची माझी इच्छा होती. परंतु, पावसामुळे मी आपल्यापर्यंत पोहचू शकलो नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना खाली खेचावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.