नगर -महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेसाठी कौल दिला. परंतु शिवसेने जनतेचा विश्वासघात करीत या तीन पक्षांनी सत्तेच्या लालसेपोटी व पदासाठी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेतून गावचा सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या सरकारने तो निर्णय रद्द करुन सदस्यातून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकशाहीचा अपमान करण्याचे काम केले, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
नगर तालुक्यातील पारेगवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. बबनराव पाचपुते, गावचे सरपंच राहुल शिंदे, मनोज कोकाटे, राहुल पानसरे, राम पानमळकर, बाबा खडसे, बन्सी कराळे, दीपक लांडगे, राजेंद्र लांडगे, गणेश शिंदे, पोपट चेमटे, संजय धोत्रे, मंगल शिंदे, वर्षा शिंदे, हिरा गुंड, महेश ठुबे, भगवान ठोंबे, रवींद्र पालवे आदी उपस्थित होते.
यावेळी धस म्हणाले, नगर-नाशिक जिल्ह्यामुळे भाजपची सत्ता गेली. दुधाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदील होऊन कांदा उत्पादनाकडे वळला आहे. करोना व अतिवृष्टीच्या संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना तुटपुंजी अर्थसहाय्याची घोषणा करुन विश्वासघात केला असून अजूनपर्यंत तिही मदत मिळाली नसल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. पाचपुते म्हणाले की, केंद्रामध्ये मोदी सरकारचे निर्णय जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे. केंद्राची मदत कधीही शेतऱ्यांपर्यंत आली नव्हती. आम्ही कधीही जिल्हा बॅकेत संचालक म्हणून गेलो नाही. जनतेच्या प्रश्नासाठी बॅकेशी संघर्ष नेहमी संघर्ष केला. माजी मंत्री कर्डिले यांनी बॅकेत जाऊन ती शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले असे ते म्हणाले.
कर्डिले म्हणाले की, केंद्र सरकारने गावच्या विकासाला चालना देण्यासाठी थेट ग्रामपंचायतला निधी देण्याचे काम केल्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळाली. पारेवाडी गावचे सरपंच राहुल शिंदे यांनी आपल्या कामातून गावातील नागरिकांचा विश्वास संपादन केला. गेली 15 वर्षापासून गावामध्ये मोठी विकास कामे केली आहेत. युवकांनी राजकारणात येऊन चांगल्या कामाचा ठसा उमटवावा. राजकारण करत असताना नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.