मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मालिकेच्या एका एपिसोडमध्ये गोकुळधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी भिडताना दिसले. यावेळी बापुजी ‘हिंदी ही मुंबईची मातृ भाषा’ आहे, असं म्हणतात. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख ‘अमेय खोपकर’ चांगलेच संतापले होते.
दरम्यान, त्यानंतर आता मराठी अभिनेता ‘स्वप्नील जोशी’ने सुद्धा ट्विटरवरून मुंबईची भाषा मराठीच, असे म्हटले आहे.
मुंबईची भाषा मराठी ! विषय कट !
अशी चूक होताच कामा नये ! आणि जर मनापासून वाटत असेल कि “चूक” झाली आहे, तर आपण मुंबई, महाराष्ट्र आणि तमाम मराठी भाषिकांची माफी मागितलीच पाहिजे ! @sabtv #म #निषेध #असितमोदी @MarathiBrain #TMKOC— स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) March 3, 2020
स्वप्नील म्हणाला कि, “मुंबईची भाषा मराठी ! विषय कट ! अशी चूक होताच कामा नये ! आणि जर मनापासून वाटत असेल कि “चूक” झाली आहे, तर आपण मुंबई, महाराष्ट्र आणि तमाम मराठी भाषिकांची माफी मागितलीच पाहिजे ! असं स्वप्नील म्हणाला.