जळगाव,- आरोग्य आणि टीईटी परीक्षेतील घोटाळ्यापाठोपाठ पोलीस भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची सुरू असणारी चर्चा निरर्थक आहे. पोलीस भरती परीक्षेत कुठलाही गैरप्रकार किंवा पेपरफुटी झाली नाही, असा स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी येथे दिले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “म्हाडा आणि आरोग्य भरतीतील गैरप्रकारानतंर आता पोलीस भरतीच्या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे काही पुरावे पोलिसांना प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, असा गैरप्रकार घडलेला नाही. तसेच या म्हाडा अीाण टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात समोर आलेल्या सर्व पुराव्यांची चौकशी केली जाते आहे. या प्रकरणात राजकीय लोकांचा सहभाग असेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही.’
“सरकारला हे प्रकरण लपवायचे असते तर इतका तपास देखील केला नसता. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून हा तपास पूर्ण केला जाईल,’ अशी ग्वाहीदेखील वळसे पाटील यांनी दिली.
पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, दोन राज्यांच्या सीमेवरील मोठा भाग या ठिकाणी असल्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिसांना कालबध्द कार्यक्रम देण्यात येऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करुन घेतले जाणार आहे.